Thursday, 2 April 2015

गौतम

रणवाद्यांचा भर ओसरला
षड्ज उगाचच विरुन गेला

     वटवृक्षाच्या छायेखाली

     जरा उमगला विरुन गेला

मौनात कळला अधिक उणा

पुन्हा विसरला विरुन गेला

      जपलेला जो माणूस त्याने

      जरा हरवला उरुन गेला

अगण्य थडगी माणुसकीची

तशातही तो स्मशान झाला
     
     तमातही आसवे तयाची
     चैतन्याच्या प्रकाशमाळा

No comments:

Post a Comment